आता तु घरी नसतेस
घरी जाताना उरात धडकी भरते
दारातली तुळस सुकलेली असते
आणी मोगराही बहरत नाही.
आता तु घरी नसतेस
घरी जाताना विचार पडतो
कुणासाठी गजरा घेउ
जुन्या गजर्यांचा आजुनही वास आहे घरात
आता तु घरी नसतेस
घरी जाताना मन गलबलतं
जिथे तुझे पैंजण छम-छम करायचे
तिथे आता खंडीभर धुळ पसरलिये.
आता तु घरी नसतेस
घरी जाताना डोळ्यात पाणी येते.
तु दारात उभी असायची वाट पाहत
आता फक्त भकास घराच दरवाजा वाट पाहतो.
आता तु घरी नसतेस
घरी जाताना जिव तुटतो
तुझे नाजुक हात आठवतात मला
ज्यावर मेहंदी फक्त माझ्यासाठीच खुलायची.






Thik Ahe,pan……
By: anjusha s on डिसेंबर 17, 2009
at 12:39 pm
Pan kay…?
By: ajayshripad on डिसेंबर 17, 2009
at 10:25 pm
. मस्तच..
बायको बरेच माहेरी गेल्यावर बरेच जन हे अनुभवतात्च… सही
आपला..
साळसुद पाचोळा.
By: साळसुद पाचोळा. on डिसेंबर 17, 2009
at 7:28 pm
बरोबर आहे बयको माहेरी गेल्यावर बर्याच जणांना हा अनुभव येतो पण जर बय कयमची गोली असेल त्याने काय करवे…!
अजय..!
By: ajayshripad on डिसेंबर 17, 2009
at 10:24 pm