Posted by: ajayshripad | डिसेंबर 17, 2009

आता तु घरी नसतेस….!


आता तु घरी नसतेस
घरी जाताना उरात धडकी भरते
दारातली तुळस सुकलेली असते
आणी मोगराही बहरत नाही.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना विचार पडतो
कुणासाठी गजरा घेउ
जुन्या गजर्‍यांचा आजुनही वास आहे घरात

आता तु घरी नसतेस
घरी जाताना मन गलबलतं
जिथे तुझे पैंजण छम-छम करायचे
तिथे आता खंडीभर धुळ पसरलिये.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना डोळ्यात पाणी येते.
तु दारात उभी असायची वाट पाहत
आता फक्त भकास घराच दरवाजा वाट पाहतो.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना जिव तुटतो
तुझे नाजुक हात आठवतात मला
ज्यावर मेहंदी फक्त माझ्यासाठीच खुलायची.


प्रतिसाद

  1. Thik Ahe,pan……

  2. . मस्तच..

    बायको बरेच माहेरी गेल्यावर बरेच जन हे अनुभवतात्च… सही

    आपला..

    साळसुद पाचोळा.

    • बरोबर आहे बयको माहेरी गेल्यावर बर्‍याच जणांना हा अनुभव येतो पण जर बय कयमची गोली असेल त्याने काय करवे…!
      अजय..!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.