Posted by: ajayshripad | जानेवारी 16, 2011

भस्म्या……..!

कशावरुन मी शाहाणा आणी तुम्ही सगळे दीड शाहाणे….?

अहो साहेब परप्रांतियांना काही बोलल्या पेक्षा तुम्ही महागाई बद्दल तरी बोला की..

नाहीतर आय. सी. सी. चे चेअरमन पद भुशवल्या शिवाय काही काम नाही तुमच्या कडे..

ईकडे ते २जी घोटाळ्यातले हात धुण्यासाठी कांदे महाग करता…

तेही डोक्यावर गेलें की पेट्रोल भडकवता……

अरे नालायक माणसांनो.. त्या “आदर्श” झालेल्या घोटाळ्याचं काय…?

का त्या एल. आ. सी. च्या पैशाचं काय…?

तुमचं काय म्हणनं आहे की सामन्य माणसाने फक्त एल. . सी. चे हप्तेच भरावेत का?

की तुमची वोट बॅंक वाचवण्यासाठी.. तुम्ही सामाण्य माणसाला अतीरेकी बनवणार आहात..?

तुम्हा नालायकांना भस्म्या झालाय… पैसे खाण्याचा…..

आम्ही कमावयचे आणी तुम्ही खायचे…

Posted by: ajayshripad | जानेवारी 15, 2011

भन्नाट….

भन्नाट हवा सुटलिये

मझी पतंग हवेत हेलकवे खतेय…

सुर्य मात्र त्रास देतोय…

कोण जाणे उगाच मधे-मधे करतोय..

अरे बाबा तुला माहीत नाहीये का…?

आज संक्रांत आहे म्हणुन..

का मला पतंग उडवु देत नाहीस..

बघ हवा सुध्धा गेलि आता.

हम्म… छान वास येतोय…

कसला वास आहे हा…?

अरे… हा गरम-गरम भज्यांचा वास आहे..

आई बोलावतेय.. म्हणतेय चल लवकर जेवण करुन घे,,,,

अरे पण लक्ष आहे कुणाचं…

माझं पुर्ण लक्षं तर माझ्या पतंगी कडे आहे…

अरे ते बघ कुणाची तरी पतंग कट्ली…..

अरे-अरे पकडा तिला….

सकाळची संध्याकाळ झाली..

माझं अजुनही पुर्ण लक्षं मझ्या पतंगीकडेच आहे..

पण आता पोटात कावळे कोकलायला लागलेत..

चला तर मग… घरी जाउन थोडंस जेवन करतो..

तुम्हीही कर…

अरे…. विसरलोच… मकर संक्रांतिच्या आपण सर्वांना खुप-खुप शुभेछ्चा……!

Posted by: ajayshripad | सप्टेंबर 23, 2010

अजय परत आला…..

बरेच दिवस आराम करुन मी आता परत लिखाणास सुरवात करतोय. थोडं चुकल्यासारखं वाटत होतं, पण आता मनं हलकं झालयं. खुप लिहायचं आहे, भरपुर विषय आहेत. आज सुरवात करावी. म्हणतात ना “जिथं दिवस निघाला तिथं सकाळ.” तुम्हा सर्वांच्या शुभेछ्चा व देवाचे आशिर्वाद सोबत राहावेत ही इछ्चा.

प्रिय मित्रांनो

मन खुप जड झालय तुम्हाला सोडुन जताना. माहीत नाही परत कधी भेट होइल किंवा नाही…

म्हणुन हा शेवटचा राम-राम आपल्या साठी.. मी ब्लॉग डिलीट करत नाहीये पण, आज पासुन परत काहीच लीहणार नाही.

सर्वप्रथम महेंद्र दादा.. आपण माझे श्रद्धास्थान आहात, खरच आपलं लिखाण वाचुन मी ईतका प्रभावित झालोय की जर काहीच सुचत नसेल तर तुमचा ब्लॉग वाचतो, नक्किच मला माहीत असते की नवीन प्रेरणा मिळेलच…

दादा यु आर ग्रेट.. आजच त्यांच्या ब्लॉगचा पहीला वर्धापन दिवस त्यांनी सजरा केलाय..

अल्हाद, गणेश, अनिकेत समुद्र… (भुंगा), अखिल जोशी, भानस, देवेंद्र चुरी, वैभव, अमृता, हेमंत आठल्ये, अपर्णा (माझीया मना), अमोल शिंदे, आदित्य, श्रिकांत सामंत, मनोज इंगळे, मेहेक, मनिषा पवार, मुग्धा, श्रेया, श्रिकांत, दिपमाला मानवतकर, भुषण, रोहीत खिरापते, अमृता वर्‍हाडपांडे, अनुप बर्वे, योनिंग डॉग(कंटाळा), अन्वि आणी छोटा इशान (सहजच), माऊ (मन मानसी), हेमंत आठल्ये (हेमंत मत), सुरेश पेठे, गौरी (मेकळे आकाश). अशी भरपुर मोठी यादी आहे ज्या लोकांना कधी मी पाहीलं नाही पण तरी मेहमी संपर्कात राहीलो, जेव्हा केव्हा एखादा नवीन लेख आला की मनापासुन वाचायचो, यापैकी कित्येक जण तर मला ओळखतही नसतिल पण माझ्यासाठी हेच माझे सखे-सोयरे.

कधी असं वाटलच नाही की मी यांना ओळखत नाही असं वाटायचं की हे सर्व मझे जवळचे मित्र आहेत. कधी समजावणीच्या भाषेत नवीन शिकायला मिळालं तर कधी, वाहवा करणारी दादही मीळाली..

येणार्‍या मे महीन्या ब्लॉग ला एक वर्ष होईल पण त्या आधीच मी धीर सोडला, कारण मलाही नक्की माहीत नाही, कींवा ही मनातली गोष्ट अशी आहे की मी ती सांगु शकत नाही..

गणेश मला तु कालच म्हणाला होतास की लिहणं का थांबवायच, त्यासाठी म्हणुन मी सांगतो, मी लीहण नाही थांबवनार, मी फक्त ब्लॉग वर लीहायचं थांबवलय.

आणी सर्वांना मी परत एकदा धन्यवाद देतो आणी आशा करतो की मी परत येइल पण नव्या रुपात.

Coz dis world is very small and any body who met once, he has to meet again

dis is ur desitiny…..!

by da way i am not very good at marathi, datz y i choozen dis last part to type in

english, like my Bro allwayz says “AJ ur very good at writting and i m good at editing”.

by da way today i have deleted all my profiles including Orkut.

so now I am fealing very nice, first when i decided to delete my

profiles i thought I afterwords will feel very bad or somthin like dat, but

now i got the point, its not ur Identity, its ur heart….! just do as ur heart sayz

so think bot the world wot it sayz nor wot it thinks bot u..! coz at de end of the day

no budy comes with u, it just u dat u have to complite ur jurny…!

now u ppl will say I am Optimist… no I am not, i dont think so…

coz till i have heart and i can take da descion.

Last But Not da Least Anju dont take tension, I will back to normal, but now i need

some time to think, n I’ll take it, thanks and God Bless U

परत एकदा वर्डप्रेस परिवारास अखेरचा राम-राम….

कृपया संपर्कात रहा: ९९२३३७१२०७

कळावे लोभ असवा

अजय शिरसाट.

 

ता. क. मी कुणाच्यासाठी म्हणुन हा ब्लॉग लीहणं बंद करत नाहीये, मी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी हे करतोय, याची नोंद घ्यावी. ANJ

Posted by: ajayshripad | जानेवारी 16, 2010

मझा फ़ेसबुक वरील दुखःद अंत…..!

आज रात्री ११ वाजुन ३ मिनीट, मित्र व अप्त यांच्या अनुपस्थितीत… मानमिय श्री अजय शिरसाट… (ए. जे. सि. सॅट.)

यांचा फ़ेसबुक या मयाजालावरील खात्याचा आमस्मिक मृत्यु झाला…. तसे मृत्युचे कारण त्यांनी वैयक्तिक सांगीतले असुन.. अद्याप खरे कारण कळु शाकले नाही…!

खुप विचार केला… बरेच दिवस लागले मला हा अकाउंट डिलिट करायला… आताही मनाची तयरी होत नाहीये ऑरकुट अकाउंट व ब्लॉग डिलिट करायची….! यामागे कारण तस काही खास नाही तरीही सांगायचं झालच तर मला आता एकट राहायचं आहे.. खुप मित्र मिळालेत या मायाजालावर, जस आपण म्हणतो ना की जग जवळ आलय तशीच काहीतरी गोष्ट झालीये, मित्र कुठेही असोत जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात, तिथुन तुम्हि त्याला हाक मारु शकता. आपले अपडेट्स, नविन फ़ोटो सर्वकाही बघु शकता.

आता मला जवळ्पास ९ ते १० वर्ष झालेत मी मायाजालावर आहे.. पण आता एकटेपण पाहीजे..!

आता म्हणाल मग फ़ोन सुध्धा बंद करायचा… तो प्रयत्न चाललाय पण ऑफ़िस वाले सुचू देत नाहीत…! आजकाल मला ओळख दाखवाविशी सुध्दा वाटत नाही.. बस एकटं राहायचं… नाहीतर गुगल वर अजय टाइप केलं की भरपुर सर्च रिझल्ट्स येतात… ते सुध्दा बंद होईल काही दिवसात…!

देव माझ्या फ़ेसबुक वरिल आत्म्यास शांती देवो…..!

डिसेंबर २००६… मधे प्रायोगिक तत्वावर सुरु केलेले भारतातले पहीले ’बस रॅपीड ट्रांसपोर्ट’. असं वाटायला लागलय की हा प्रयोग पुणेकरांच्या बोकांडीवर बसायला लागला आहे. ह्या बिआरटी मधे १३ कि.मी. चा रस्ता वापरण्यात आलेला आहे. यावत एयर कंडीशंड वोल्वो बसेस धावतात. तिन रुट वापरले गेले आहेत यात. १.कात्रज २.स्वारगेट आणी ३.हडपसर.

आता यात शासनाचा किती फायदा आहे..? हे आपल्याला पहीले समजुन घ्यायला पाहीजे. पहीले तर एयर कंडीशंड वोल्वो बस यावर धावत असल्यामुळे सामान्य नागरीकाची इच्छा असो किंवा नसो, जादा भाडं देउन बस बोर्ड करावी लागते. कारण पि. एम. टी. कर्मचार्‍यांना कुठल्याही माणसाच्या वेळेची कदर नाही. मग तो कुणी म्हातारा असो किंवा स्त्रिया असोत. ते आपल्या मनाने गाडी पळवणार, जर कुणी प्रश्न विचारायची हीम्मत केलीच तर त्यांच्याकडे उत्तर तयारच आहे.. “मग स्वतःच्या गाडीने प्रवास करा”. दुसरी गोष्ट म्हणजे आणी गाड्यांना भरपुर ऍव्हरेज मिळतो म्हणजे इथेही शासनाचाच फायदा.

आज सकाळचीच गोष्ट आहे मी ऑफिस संपऊन घारि जात होतो एक काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर, हडपसर जवळ क्रोम मॉल जवळ बिआरटी च्या डिव्हायडर वर चढलेली होती. गाडीचं भरपुर नुकसान झालेलं होतं. आपल्याला माहीत आहे. थोड्या वेळाने हा गाडीवाला टोईंग वाल्यांना बोलाउन गडी घेउन जाणार, त्या आधी पोलिस येउन पंचनामा करणार. पण भुर्दंड कुणाला शासनाला…? नाही.. गाडी मालकाला.

आता तुम्ही म्हणनार चालकाची चुक होती, पण मला सांगा ह्या बिआरटी ने किती रस्ता व्यापलेला आहे…? जवळपास अर्द्यापेक्षाही जास्त. त्यात तुटलेले डिव्हायडर आहेत. एकही ग्लोसाईन काम करेनासं झालं आहे. आता ही सुद्धा चालकाचीच चुक का…? अरे जर आम्हाला जयला रस्ता जर नसेल तर आम्ही पण बिआरटी च्याच मार्गाने गाडी चालवनार. जर वाहतुक पोलीसांनी पकडलच तर १०० रुपये देउन सुटनार, आता मला पोलिस खात्याबद्दल जास्त बोलायच नाही आहे, आणी वाहातुक पोलिस तर सोडुनच द्या. अशी जवळपास सर्व पुणेकरांची मनस्थिती झालेली आहे. बरं यात सर्वात मोठा हात आहे प्रायव्हेट कंपन्यांमधल्या कॅब वाल्यांचा. त्यांना बिआरटी आणी सामान्य रस्ता यातला फरक माहीतच नाही ते नुसत गाडी कशी दामटायची हेच जाणतात. दुसरा नंबर आहे तो, पल्सर आणी यामाहा चालवणार्‍या कारट्यांचा. त्यांना असं वाटतं की कुठलाही रस्ता आपल्या तिर्थरुपांनीच बांघलेला आहे. मग ते स्वारगेट असो की सिंहगड रोड असो. आणी त्यातल्या त्यात जर एखादी कन्यका जर मागे बसलेली असेल तर मग हे त्या टु व्हिलर वर बसलेले असतानाही बोईंग ७४७ मधे बसलेले असल्याचा अभाव आणतात आणी अश्या प्रकारे गाडी पळवतात की, बघणार्‍याचा जिवही वरखाली होतो.

बरं या सर्वात कुणी सामान्य नागरीकांची पर्वाच करत नाही. ज्या ठीकाणी बस स्टॉप आहेत त्या ठी काणी जवळपास आठ फुटांचा रस्ता पार करुन त्या बस स्टॉप वर यावं लागतं. सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत ह्या रस्त्यांवर इतकी गर्दी असते की माझ्या सारखा धट धाकट माणुस सुद्धा रस्ता पार करु शकत नाही, आणी करायचा म्हटल्यास जिव हातात घेउनच करावा लागतो. बाय द वे मला हे आज पर्यंत न उलगडलेलं कोडं आहे, की हे पीएमटी चालक स्वतःला काय समजता…? फॉर्म्युला वन ड्रायव्हर…? अरे इतकी जवळ आणुन बस थांबवतात की वाटतं थोडा जर निशाना जर चुकला तर गेलाच समजा आपला हत किंवा पाय. अरे कधी-कधी तर सरळ अंगावर गाडी घालतात. हात दाखवल्याशीवाय गाडी थांबवत नाही. दे आर सपोज टु स्टॉप ऍट एव्हरी स्टॉप. पण नाही अरे आजकाल तर म्हातार्‍या लोकांना सुद्धा पुढच्या गेटने चढु देत नाहीत. नाही तेव्हा लोंढा भरतात गाडित नाही तेव्हा हडपसर पासुन स्वारगेट पर्यंत गाडी रिकामी नेतात. याचा काय अर्थ.

जेव्हा सर्वांना माहीत आहे की या बिआरटी मुळे पुण्यातल्या नागरिकांना काहीच फायदा झालेला नाही तर मग कशाला बिआरटी केलय. खर सांगायच झालं तर आधीही स्वारगेट ते कात्रज जायला ३५ मिनिटे लागायची आणी आताही तितकीच लागतात. बरं ह्या हडपसर रोडवर बिआरटी रोडच्या मधे इतके मोठे डिव्हायडर लावले आहेत, त्यानंतर सायकल वाल्यांसाठी वेगळा रस्ता केलेला आहे, पाई चालणार्‍यांच काय. का फक्त बिआरटी आणी पाई चालणारेच आहेत का पुण्यात…?

दर दिवसाला सोलापुर रोडवर ऍक्सीडेंट्स होतायत, त्यासाठी प्रशासन काय करतय..? काहीच नाही. आणी आता सिंहगड रोडला बिआरटी जोडणार आहेत असं मी ऐकलयं. अरे जरा या शासकीय अधिकार्‍यांना म्हणा की जरा दोन दिवस संतोश हॉलच्या चौकात सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान टु व्हीलर वर जाउन दाखवा. मग म्हणतो खरच “है दम…?” अरे कीती पैसा बळकावणार. बस झालं आता, आम्हाला नावं घ्यायला मजबुर करु नका… वेळीच हे बिआरटी नावाचं कुत्रं आवरा.. नाहीतर परिणाम फार वाईट होतिल….

Posted by: ajayshripad | डिसेंबर 18, 2009

कुठेतरी कशीतरी भेटना तु…!

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज येते कॉलेजात बघत नाहीस तु
मुलींच्या घोळ्क्यात बसतेस
कधीतरी माझ्याशीही बोलना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज दिसते बसस्टॉप हसत नाहीस तु
तिसर्‍या विंडोसीट वर बसतेस
कधीतरी माझ्याजवळही बसना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
दर शुक्रवारी मंदीरात येतेस
सर्वांना आठवणीने प्रसाद देतेस
कधीतरी मझ्या हातवरही प्रसाद ठेवना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
बघते रोज मला लपुन-लपुन
दमलो मी आता वाट बघुन-बघुन
छळु नकोस आता अशी दुरुन-दुरुन
रोज रात्री स्वप्नात माझ्या येतेस
आता तरी एकदाची माझ्या आयुष्यात येना तु.
Posted by: ajayshripad | डिसेंबर 17, 2009

आता तु घरी नसतेस….!

आता तु घरी नसतेस
घरी जाताना उरात धडकी भरते
दारातली तुळस सुकलेली असते
आणी मोगराही बहरत नाही.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना विचार पडतो
कुणासाठी गजरा घेउ
जुन्या गजर्‍यांचा आजुनही वास आहे घरात

आता तु घरी नसतेस
घरी जाताना मन गलबलतं
जिथे तुझे पैंजण छम-छम करायचे
तिथे आता खंडीभर धुळ पसरलिये.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना डोळ्यात पाणी येते.
तु दारात उभी असायची वाट पाहत
आता फक्त भकास घराच दरवाजा वाट पाहतो.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना जिव तुटतो
तुझे नाजुक हात आठवतात मला
ज्यावर मेहंदी फक्त माझ्यासाठीच खुलायची.

Posted by: ajayshripad | डिसेंबर 16, 2009

आनंदी आनंद गडे..!

गेले तिन दिवस मी जरा कमी जेवण करतोय

आमची मेस बंद आहे म्हणुन.

बड-बड खुप जास्त चालली आहे

कसला विचार न कराता मी बोलतोय ऑफीस मधे.

किती दिवस झालेत गाडी पळवली नाही

धुळ खात पडलेली आहे दारात माझ्या.

मी निर्लज्ज झालोय, मला गाडी पुसाविही वाटत नाही.

आज काला दर आठवड्याला सलुन मधे जाउन

दाढि करण्या ऐवजी मी डोक्याची चकोटी करतोय.

काम काही नाही असं म्हणतोय, घरात कपड्यांचा

ढिग लागलाय पण धुण्याची इच्छाच होत नाहीये.

सिगरेट सोडुन ३ महीने झालेत तरीही,

रुम मधला ऍश ट्रे तसाच आहे,

कुणालातरी भेट म्हणुन द्यावा याचाच विचार करतोय मी.

रात्रभर शीफ़्ट करायचा आता कंटाळा येतोय.

किती दिवस तेच जेवण, तोच रस्ता, तिच गाडी, तेच काम…?

नाईलाज झालाय तेच ते चेहरे बघायचा.

या लोकांना का नाही येत तेच ते काम करायचा कंटाळा.

सुंदर दिसणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे

पण तुम्ही सुंदर दिसता याचा गर्व न केलेलाच बर

म्हणतात ना गर्वाचे घर खाली.

तसही आजकाल माझं घर खाली-खालीच आहे.

खुप गर्दी असते भोवताली तरीही एकटं-एकटं वाटतं.

परवा बॅरीअर मुव्ही बघितली

काय सुंदर काम केलय सर्वांनी त्यात.

स्टोरि लाईन पण खुप छान आहे.

वर्थ वॉचींग वन्स…..

हो ना आता तर असच चालणार.

कधीही घरी यायचं आणी कधीही जायचं.

जगण्याचा अर्थ शोधायला मी काही मोठा महान आत्मा वगेरे नाही

तरीही जर कुणाला सापडला तर त्याने संपर्क साधावा.

Posted by: ajayshripad | डिसेंबर 16, 2009

रोज सायंकाळी ती मला भेटायची……!

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

मोगर्‍याचा गजरा आणी डोळ्यात काजळ लाउन.

दिवसभरचा थकवा एका क्षणात पार कुठेतरी पळायचा

आणी उरायचा तो फक्त मंद-मंद मोगर्‍याचा सुवास.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

गर्दीत वेगळीच उठुन दिसायची.

तलम रेशमी ओढणीला तिच्या स्पर्श होताच,

प्राजक्तांच्या फुलासारखी भासायची.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

घाई-घाई यायची आणी लवकर जाते म्हणायची.

मी बळेच तिचा हात धरल्यावर,

लाजुन चुर-चुर व्हायची.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

जरा वेळ जवळ येउन बसायची.

अंधार पडायला लागला की,

रानात एकट्या सापडलेल्या हरणीसारखी घाबरायची.

 

आता सायंकाळी मी एकटाच असतो,

मनातल्या आठवणींना उजाळा देत असतो.

तिच्या आठवणी कधी संपतच नाहीत,

लपुन राहतात मनाच्या कोपर्‍यात कुठेतरि…..

 

 

 

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.