
डिसेंबर २००६… मधे प्रायोगिक तत्वावर सुरु केलेले भारतातले पहीले ’बस रॅपीड ट्रांसपोर्ट’. असं वाटायला लागलय की हा प्रयोग पुणेकरांच्या बोकांडीवर बसायला लागला आहे. ह्या बिआरटी मधे १३ कि.मी. चा रस्ता वापरण्यात आलेला आहे. यावत एयर कंडीशंड वोल्वो बसेस धावतात. तिन रुट वापरले गेले आहेत यात. १.कात्रज २.स्वारगेट आणी ३.हडपसर.
आता यात शासनाचा किती फायदा आहे..? हे आपल्याला पहीले समजुन घ्यायला पाहीजे. पहीले तर एयर कंडीशंड वोल्वो बस यावर धावत असल्यामुळे सामान्य नागरीकाची इच्छा असो किंवा नसो, जादा भाडं देउन बस बोर्ड करावी लागते. कारण पि. एम. टी. कर्मचार्यांना कुठल्याही माणसाच्या वेळेची कदर नाही. मग तो कुणी म्हातारा असो किंवा स्त्रिया असोत. ते आपल्या मनाने गाडी पळवणार, जर कुणी प्रश्न विचारायची हीम्मत केलीच तर त्यांच्याकडे उत्तर तयारच आहे.. “मग स्वतःच्या गाडीने प्रवास करा”. दुसरी गोष्ट म्हणजे आणी गाड्यांना भरपुर ऍव्हरेज मिळतो म्हणजे इथेही शासनाचाच फायदा.
आज सकाळचीच गोष्ट आहे मी ऑफिस संपऊन घारि जात होतो एक काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर, हडपसर जवळ क्रोम मॉल जवळ बिआरटी च्या डिव्हायडर वर चढलेली होती. गाडीचं भरपुर नुकसान झालेलं होतं. आपल्याला माहीत आहे. थोड्या वेळाने हा गाडीवाला टोईंग वाल्यांना बोलाउन गडी घेउन जाणार, त्या आधी पोलिस येउन पंचनामा करणार. पण भुर्दंड कुणाला शासनाला…? नाही.. गाडी मालकाला.
आता तुम्ही म्हणनार चालकाची चुक होती, पण मला सांगा ह्या बिआरटी ने किती रस्ता व्यापलेला आहे…? जवळपास अर्द्यापेक्षाही जास्त. त्यात तुटलेले डिव्हायडर आहेत. एकही ग्लोसाईन काम करेनासं झालं आहे. आता ही सुद्धा चालकाचीच चुक का…? अरे जर आम्हाला जयला रस्ता जर नसेल तर आम्ही पण बिआरटी च्याच मार्गाने गाडी चालवनार. जर वाहतुक पोलीसांनी पकडलच तर १०० रुपये देउन सुटनार, आता मला पोलिस खात्याबद्दल जास्त बोलायच नाही आहे, आणी वाहातुक पोलिस तर सोडुनच द्या. अशी जवळपास सर्व पुणेकरांची मनस्थिती झालेली आहे. बरं यात सर्वात मोठा हात आहे प्रायव्हेट कंपन्यांमधल्या कॅब वाल्यांचा. त्यांना बिआरटी आणी सामान्य रस्ता यातला फरक माहीतच नाही ते नुसत गाडी कशी दामटायची हेच जाणतात. दुसरा नंबर आहे तो, पल्सर आणी यामाहा चालवणार्या कारट्यांचा. त्यांना असं वाटतं की कुठलाही रस्ता आपल्या तिर्थरुपांनीच बांघलेला आहे. मग ते स्वारगेट असो की सिंहगड रोड असो. आणी त्यातल्या त्यात जर एखादी कन्यका जर मागे बसलेली असेल तर मग हे त्या टु व्हिलर वर बसलेले असतानाही बोईंग ७४७ मधे बसलेले असल्याचा अभाव आणतात आणी अश्या प्रकारे गाडी पळवतात की, बघणार्याचा जिवही वरखाली होतो.
बरं या सर्वात कुणी सामान्य नागरीकांची पर्वाच करत नाही. ज्या ठीकाणी बस स्टॉप आहेत त्या ठी काणी जवळपास आठ फुटांचा रस्ता पार करुन त्या बस स्टॉप वर यावं लागतं. सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत ह्या रस्त्यांवर इतकी गर्दी असते की माझ्या सारखा धट धाकट माणुस सुद्धा रस्ता पार करु शकत नाही, आणी करायचा म्हटल्यास जिव हातात घेउनच करावा लागतो. बाय द वे मला हे आज पर्यंत न उलगडलेलं कोडं आहे, की हे पीएमटी चालक स्वतःला काय समजता…? फॉर्म्युला वन ड्रायव्हर…? अरे इतकी जवळ आणुन बस थांबवतात की वाटतं थोडा जर निशाना जर चुकला तर गेलाच समजा आपला हत किंवा पाय. अरे कधी-कधी तर सरळ अंगावर गाडी घालतात. हात दाखवल्याशीवाय गाडी थांबवत नाही. दे आर सपोज टु स्टॉप ऍट एव्हरी स्टॉप. पण नाही अरे आजकाल तर म्हातार्या लोकांना सुद्धा पुढच्या गेटने चढु देत नाहीत. नाही तेव्हा लोंढा भरतात गाडित नाही तेव्हा हडपसर पासुन स्वारगेट पर्यंत गाडी रिकामी नेतात. याचा काय अर्थ.
जेव्हा सर्वांना माहीत आहे की या बिआरटी मुळे पुण्यातल्या नागरिकांना काहीच फायदा झालेला नाही तर मग कशाला बिआरटी केलय. खर सांगायच झालं तर आधीही स्वारगेट ते कात्रज जायला ३५ मिनिटे लागायची आणी आताही तितकीच लागतात. बरं ह्या हडपसर रोडवर बिआरटी रोडच्या मधे इतके मोठे डिव्हायडर लावले आहेत, त्यानंतर सायकल वाल्यांसाठी वेगळा रस्ता केलेला आहे, पाई चालणार्यांच काय. का फक्त बिआरटी आणी पाई चालणारेच आहेत का पुण्यात…?
दर दिवसाला सोलापुर रोडवर ऍक्सीडेंट्स होतायत, त्यासाठी प्रशासन काय करतय..? काहीच नाही. आणी आता सिंहगड रोडला बिआरटी जोडणार आहेत असं मी ऐकलयं. अरे जरा या शासकीय अधिकार्यांना म्हणा की जरा दोन दिवस संतोश हॉलच्या चौकात सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान टु व्हीलर वर जाउन दाखवा. मग म्हणतो खरच “है दम…?” अरे कीती पैसा बळकावणार. बस झालं आता, आम्हाला नावं घ्यायला मजबुर करु नका… वेळीच हे बिआरटी नावाचं कुत्रं आवरा.. नाहीतर परिणाम फार वाईट होतिल….






