‘इच्छामृत्यू एक वरदान’

कधी कधी गंभीर विषयावरही मनांतले काही बोलून दाखवावेसे वाटते. इच्छामृत्यू एक वरदान हा पण विषय तसाच आहे. चर्चेचा विषय असून किंवा त्यावर खोलवर दृष्टी सगळयांचीच जावी अथवा विचार व्हावा असे वाटत असूनही काही इलाज नसल्याने पुढे कोणीच धजावत नाहीत. वैद्यकीय नियमांत किंवा आपल्या संविधानात अशा प्रकारचा काही नियम नाही.
सुलभ मृत्यूची इच्छा प्रत्येक प्राणीमात्र बाळगून आहे. पण कोणाच्या नशिबाचे ह्या बाबतीत दार उघडेल हे सगळे अंधारातच आहे. समाजात किती तरी प्रकारचे लोक आहेत – गरीब आणि श्रीमंत. असे पण काही ज्यांना संपूर्ण आयुष्यभर काही न काही तरी त्रास भोगावा लागतो, हाडाची काडे करून एका हातावर मिळविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे हा एक वर्ग तर ऐश्वर्यात लोळणारा- कष्टाची झळ न पोहोचणारा दुसरा वर्ग, पण शेवटी जीवन हे सगळयांचेच आहे आणि जगायचेच आहे. प्रत्येक माणूस जगतोच आहे.
जीवन सुरू झाले तर अंत निश्चित आहे, पण सुलभ होवो ही मनीषा. आपण आपळया आजूबाजूला असे किती तरी जीव बघतो जे जगताहेत पण बघणाऱ्यांचे काळीज पिळवटून निघते व आपसूकच मनांत का होईना पण देवा ह्याला सोडव रे बाबा असे आपण म्हटळयाशिवाय रहात नाही. इतक्या यातना, इतके शरीराला कष्ट मृत्यूजवळ तर जवळपास पोहोचलेलेच असतात पण त्याला हात लावू शकत नाहीत. अशा लोकांसाठी इच्छामृत्यू एक वरदानच ठरेल. ह्या संदर्भात फादर लुई वेदरहेड ने म्हंटले होते, ”असाध्य रोगांनी ग्रासलेळया, शरीराची बरीचशी इंद्रियांनी काम करण्यास नाकारलेल्या जीवाला कृत्रिम मशीन लावून त्याच्या इच्छेविरूध्द त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव शिक्षा का देत नाही.” आणि हे लोक म्हणजे डॉक्टर्सच नं! पण जर त्यांनी जीव वाचविण्याची शपथ घेतली आहे तर ते जीव कसा घेणार हो!
हे सगळे नजरेसमोर ठेवता इच्छामृत्यू चा कायदा किती महत्वपूर्ण आहे आणि त्यावर विचार केला जाणे जरूरी आहे हे ठळकपणे जाणवू लागले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली मते सांगण्याचा आणि स्वयंनिर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कुणी जर आपळया शारीरिक त्रासदींना कंटाळून तो असे जाहिरपत्र लिहून देत असेल – ”जर डॉक्टरांच्या मते आता ह्यापुढे मला ह्या शारीरिक यातनांपासून मुक्ती मिळू शकणार नसेल तर अश्या दुर्भाग्यपूर्ण अवस्थेमधे कृत्रिम उपचारांवर परावलंबी आणि लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा मला इच्छामृत्यू देऊन मुक्ती द्यावी” तर अशा इच्छामृत्यपत्राचा आदर केला गेला पाहिजे. इच्छामृत्यू एक वरदान सिध्द होऊ शकते असे फक्त म्हणून काय उपयोगाचे? ह्या म्हणवल्या जाणाऱ्या वरदानाला जगात कुठेही मान्यता मिळालेली नाहीये. इच्छामृत्यू वा दयामृत्यू हा सध्या एक मोठा वादाचा विषय होऊन बसला आहे. विषयाच्या बाजूने आणि विरूध्द वाद सुरूच आहे.
आजारपणांत रोग्याचा त्रास दूर करण्यात प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील असतोच. असेच एक डॉक्टर आहेत ऑस्ट्रेलियाचे डॉ.फिलिप. त्यांच्या मते जर उपलब्ध डॉक्टरी उपाय रोगीच्या वेदना कमी करण्यात सक्षम नसतील आणि मृत्यू हा अखेरचाच उपाय डॉक्टरांच्या नजरेसमोर असेल तर त्या जीवघेण्या (पण लवकर न संपणाऱ्या) वेदना सहन करत राहण्यापेक्षा व मृत्यूची वाट बघत बसण्यापेक्षा त्या रोग्याला सुखद मृत्यू देण्यात यावा. त्यांचे ह्या बाबतीत प्रयत्न सुरू आहेतच. खूप विरोध सहन करावा लागत असतांना पण ते आपळ्या ह्या मताशी चिकटून आहेत. इच्छामृत्यू किंवा दयामृत्यू, ह्याचा ते इतक्या प्रखरतेने प्रचार करत आहेत की ऑस्ट्रेलिया मधे त्यांना डॉ ड़ेथ ह्याच नावाने आता सगळे ओळखू लागले आहेत.
ह्या इच्छामृत्यू साठी तत्काळ मृत्य यावा म्हणून त्यांनी एक खास मशीन, डेथ मशीन पण बनविली आहे. ते कायद्याच्या विरूध्द तर जाऊ शकत नाहीत पण त्यावर पर्याय शोधण्याच्या मागे मात्र जरूर आहेत. आंतर्राष्ट्रीय समुद्रात जहाजावर इच्छामृत्यू देणे व येथे ऑस्ट्रेलियन कायद्याला चालू न देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना पक्का विश्वास आहे की त्यांना यश नक्कीच मिळेल. त्यांनी असा पण दावा केला आहे कि त्यांना आजपर्यंत 200 हून अधिक लोकांनी इच्छामृत्यू मागितला आहे.
तीव्र वेदना सहन करणाऱ्या व्यक्तिची अशी इच्छामृत्यूची विनवणी समोरच्या माणसाला हलवून सोडते. जर सगळयांनी ह्या विषयावर थोडा जरी विचार करायला सुरूवात केली तरी कदाचित काही पर्याय शोधता येईल. प्रजासत्ताक देशात जेंव्हा सत्तापक्ष असा सामाजिक क्रांति घडवून आणणारा प्रस्ताव आणतो तेंव्हा विरूध्द पक्षाकडून तो हाणून पाडला जातो. भारतासारख्या परंपरावादी देशात असे कायदे लागू होण्याची शाश्वती वाटत नाही. असा कायदा कदाचित लागू होणे अशक्य असेल पण रोगी स्वतः जर का ही इच्छा व्यक्त करत असेल आणि त्याच्या यातना बघवत नाहीत असे म्हणणाऱ्या त्याच्या कुटुंबातील लोकांचे त्याला सहकार्य मिळाले तरच हे काही प्रमाणात शक्य होऊ शकते. पण कितीही झाले तरी कुटुंबातील सदस्य कधी ह्याला तयार होतील? इच्छामृत्यू ह्या विषयाची दूसरी बाजू अशी पण आहे की डॉक्टर जेंव्हा पूर्णपणे रोगीच्या बाबतीत हताश आहेत तेंव्हा ते स्वतः रोग्याच्या बाजूने उभे राहू शकतात. असह्य वेदनेतला रोगी सोप्या मृत्यूला जवळ करू शकतो. इच्छामृत्यू आणि सहज सोपा मृत्यू, ह्यासाठी रोग्याला मदत करण्याला रोग्याचा जीव घेणे असे म्हणू शकत नाही. सेवाधर्म ह्या डॉक्टरांनी सोडून दिला आहे असा विचार करणे पण बरोबर नाही.
बऱ्याच वेळा जन्मतःच असे रोगी असतात जे मानसिक व शारीरिक दृष्टया लाचार असतात. समाज किंवा कुटुंबातील व्यक्ति त्यांना परावलंबी व बोझा समजत नसतील पण, पण ही सत्यपरिस्थिति आहे. ह्या लोकांना ही समज पण नसते. अशा व्यक्तिंसाठी डॉक्टर व कुटुंबातील सदस्य ह्यावर निर्णय घेऊ शकतात.
नीदरलैंडमधे अश्या इच्छामृत्यूला सुरूवात झाली आहे. ह्याचबरोबर जेंव्हा नुकतेच जन्मलेले बाळ बऱ्याच गोष्टींची कमी घेऊन जन्मले असेल व पूढचे आयुष्य त्याचे अंधारात आणि खूपच भयावह असेल तर त्याला पण असा मृत्यू देऊ शकतो. फक्त सगळयांचा सह्योग इथे पण आवश्यक असतोच.
डॉ. केव्होरकीयनने पण अमेरिकेत 80 च्या वर अशा प्रकारच्या लोकांना मृत्यू देण्यात मदत केली आहे पण त्यांना आवश्यकतेनुसार सह्योग प्राप्त झाला होता हे विशेष. इच्छामृत्यू व तो ही एकदम कमी त्रासाचा व ताबडतोब मिळवून देणाऱ्या पध्दतींवर अधिक जोर दिला जातो.
काही रोगी असे असतात जे आपल्या इच्छाशक्ति आणि आत्मशक्तिच्या जोरावर ओढवणारे कुठलेही दुःख झेलायला तयार असतात पण काही असा वर्ग आहे जो आजाराचे नाव व तीव्रता समजताच हातपाय गाळू लागतात. अशा निराशावादी लोकांना पण जीवनाचा अंत करण्याचा हा एक पर्याय आहे.
तसे बघितले तर ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की असा मृत्यू कोणाला देणे सोपे काम नाही. पण रोग्याची एक सारखी इच्छामृत्यूची इच्छा, डॉक्टरांची सहमती आणि कुटुंबाचा सह्योग असला तर इच्छामृत्यू सफल होऊ शकतो. आता हेच बघायला हवे की इच्छामृत्यू न्यायिक सम्मति मिळून हा व्यवहारात येऊ शकतो का?

Leave a comment »

2009 माहाराष्ट्र विधान सभा मतदान निकाल……!

राज्यातील विजयी 288 उमेदवार…..!

बराच मोठा पोस्ट होतोय….! तर ज्या दिवसाची वाट बघत होतो तो उजाडलाच, शेवटी काँग्रेस राष्ट्रवादी ने बाजी मारलिच.
भाजपाला बर्याच ठिकाणांवरुन झटका बसला, व मनसे ची चांगली सुरवात झाली.

भाजपा शिवसेना: 92, काँग्रेस राष्ट्रवादी:142, मनसे:13, इतर:41

उत्तर महाराष्ट्र
नंदूरबार
1   अक्कलकुवा (एसटी) के.सी.पाडवी (काँग्रेस)
2   शहादा (एसटी) पद्माकर वळवी (काँग्रेस)
3   नंदूरबार (एसटी) विजयकुमार गावित (राष्ट्रवादी)
4   नवापूर (एसटी) शरद गावित (सपा)

धुळे
5   साक्री (एसटी) योगेश भोये (काँग्रेस)
6   धुळे ग्रामीण  शरद पाटील (शिवसेना)
7   धुळे शहर  अनिल गोटे (लोकसंग्राम)
8   शिंदखेडा  जयकुमार रावळ ( भाजप)
9   शिरपूर (एसटी) काशीराम पावरा (काँग्रेस)

जळगाव
10   चोपडा (एसटी) जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
11   रावेर  शिरीष चौधरी ( काँग्रेस बंडखोर)
12   भुसावळ (एससी) संजय सावकारे (राष्ट्रवादी)
13   जळगाव शहर सुरेश जैन (शिवसेना)
14   जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
15   अमळनेर  साहेबराव पाटील (अपक्ष)
16   एरंडोल  चिमण पाटील (शिवसेना)
17   चाळीसगाव  राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
18   पाचोरा  दिलीप वाघ (राष्ट्रवादी)
19   जामनेर  गिरीश महाजन (भाजप)
20   मुक्ताईनगर  एकनाथ खडसे (भाजप)

नाशिक
21   नांदगाव  पंकज भुजवळ (राष्ट्रवादी)
22   मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती इस्माईल (जनसुराज्य)
23   मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना)
24   बागलाण (एसटी) उमाजी बोरसे (भाजप)
25   कळवण (एसटी) ए.टी.पवार (राष्ट्रवादी)
26   चांदवड  शिरीष कोतवाल (अपक्ष)
27   येवला  छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
28   सिन्नर   माणिकराव कोकाटे (काँग्रेस)
29   निफाड  अनिल कदम (शिवसेना)
30   दिंडोरी (एसटी) धनराज महाले (शिवसेना)
31   नाशिक पूर्व उत्तमराव ढिकले (मनसे)
32   नाशिक मध्य वसंत गिते (मनसे)
33   नाशिक पश्चिम  नितीन भोसले (मनसे)
34   देवळाली (एससी) बबन घोलप (शिवसेना)
35   इगतपुरी (एसटी) निर्मला गावित (काँग्रेस)

विदर्भ
बुलडाणा
1   मलकापूर  चैनसुख संचेती (भाजप)
2   बुलडाणा  विजयराज शिंदे (शिवसेना)
3   चिखली   राहुल बोंद्रे (काँग्रेस)
4   सिंदखेड राजा राजेन्द्र शिंगणे (राष्ट्रवादी)
5   मेहकर (एससी) संजय रायमूलकर (शिवसेना)
6   खामगाव  दिलीप सानंदा (काँग्रेस)
7   जळगाव जामोद डॉ.संजय कुटे (भाजप)

अकोला
8   अकोट  संजय गावंडे (शिवसेना)
9   बाळापूर  बळीराम शिरोसकर (भारिप-बम)
10   अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा (भाजप)
11   अकोला पूर्व हरिदास भदे (भारिप-बम)
12   मूर्तिजापूर  हरिश पिंपळे (भाजप)

वाशिम
13   रिसोड  सुभाष झनक (काँग्रेस)
14   वाशिम (एससी) लखन मलिक (भाजप)
15   कारंजा  प्रकाश डहाके (राष्ट्रवादी)

अमरावती
16   धामनगाव रेल्वे वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)
17   बडनेरा  रवीकुमार राणा (अपक्ष)
18   अमरावती  रावसाहेब शेखावत (काँग्रेस)
19   तिवसा  यशोमती ठाकूर (काँग्रेस)
20   दर्यापूर (एससी) अभिजीत अडसूळ (शिवसेना)
21   मेळघाट (एसटी) केवलराम काळे (काँग्रेस)
22   अचलपूर  बच्चू कडू (अपक्ष-रिडालोस)
23   मोर्शी  अनिल बोंडे (अपक्ष)

वर्धा
24   आर्वी  दादाराव केचे (भाजप)
25   देवळी  रणजीत कांबळे (काँग्रेस)
26   हिंगणघाट  अशोक शिंदे (शिवसेना)
27   वर्धा  सुरेश देशमुख (राष्ट्रवादी बंडखोर)
28   काटोल  अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

नागपूर
29   सावनेर  सुनील केदार (काँग्रेस)
30   हिंगणा   विजय घोडमारे (भाजप)
31   उमरेड (एससी) सुधीर पारवे (भाजप)
32   नागपूर दक्षिण पश्चिम देवेन्द्र फडणवीस (भाजप)
33   नागपूर दक्षिण दिनानाथ पडोळे (काँग्रेस)
34   नागपूर पूर्व  कृष्णा खोपडे (भाजप)
35   नागपूर मध्य विकास कुंभारे (भाजप)
36   नागपूर पश्चिम सुधाकर देशमुख (भाजप)
37   नागपूर उत्तर (एससी) नितीन राऊत (काँग्रेस)
38   कामठी  चंद्रशेखऱ बावनकुळे (भाजप)
39   रामटेक  मल्लिकार्जून रेड्डी (गोंगपा)

भंडारा
40   तुमसर  अनिल बावनकर (काँग्रेस)
41   भंडारा (एससी) नरेन्द्र भोंडकर (शिवसेना)
42   साकोली  नाना पटोले (भाजप)

गोंदिया
43   अर्जूनी मोरगाव (एससी) राजकुमार बडोले (भाजप)
44   तिरोडा  डॉ. खुशाल बोपचे (भाजप)
45   गोंदिया  गोपाल अगरवाल (काँग्रेस)
46   आमगाव (एसटी) रामरतन राऊत (काँग्रेस)

गडचिरोली
47   आरमोरी (एसटी) आनंदराव गेडाम (काँग्रेस)
48   गडचिरोली (एसटी) नामदेव हुंसेंडी (काँग्रेस)
49   अहेरी (एसटी) दीपक अत्राम (अपक्ष)

चंद्रपूर
50   राजुरा  सुभाष धोटे ( काँग्रेस)
51   चंद्रपूर (एससी) नाना श्यामकुळे (भाजप)
52   बल्लारपूर  सुधीर मुनगंटीवार (भाजप)
53   ब्रह्मपुरी  अतुल देसकर (भाजप)
54   चिमूर  विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
55   वरोरा  संजय देवताळे (काँग्रेस)

यवतमाळ
56   वणी  वामनराव कासावार (काँग्रेस)
57   राळेगाव (एसटी) वसंत पुरके (काँग्रेस)
58   यवतमाळ (एसटी) निलेश पारवेकर (काँग्रेस)
59   दिग्रस  संजय राठोड (शिवसेना)
60   आर्णी (एसटी) शिवाजीराव मोघे (काँग्रेस)
61   पुसद  मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
62   उमरखेड (एससी) विजय खडसे (काँग्रेस)

मराठवाडा
नांदेड
1   किनवट  प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
2   हदगाव  माधवराव पवार (काँग्रेस)
3   भोकर  अशोक चव्हाण (काँग्रेस)
4   नांदेड उत्तर  डी.पी.सावंत (काँग्रेस)
5   नांदेड दक्षिण ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस)
6   लोहा  शंकरअण्णा धोंडगे (राष्ट्रवादी)
7   नायगाव  वसंत चव्हाण (अपक्ष)
8   देगलूर (एसटी) रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
9   मुखेड  हनुमंत पाटील-बेटमोगरेकर(काँग्रेस)

हिंगोली
10   बसमत  जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी)
11   कळमनुरी  राजीव सातव (काँग्रेस)
12   हिंगोली  भाऊराव पाटील (काँग्रेस)

परभणी
13   जिंतूर  रामप्रसाद बोर्डीकर (काँग्रेस)
14   परभणी  संजय बंडू जाधव (शिवसेना)
15   गंगाखेड  सीताराम घनदाट (अपक्ष)
16   पाथरी  मीरा रेंगे-पाटील (शिवसेना)

जालना
17   परतूर  सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)
18   घनसांगवी राजेश टोपे (राष्ट्रवादी)
19   जालना  कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
20   बदनापूर (एससी) संतोष सांबरे (शिवसेना)
21   भोकरदन  चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)

औरंगाबाद
22   सिल्लोड  अब्दुल सत्तार (काँग्रेस)
23   कन्नड  हर्षवर्धन रायभान जाधव (मनसे)
24   फुलंब्री  कल्याण काळे (काँग्रेस)
25   औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना बंडखोर)
26   औरंगाबाद पश्चिम(एससी)संजय शिरसाट (शिवसेना)
27   औरंगाबाद पूर्व राजेन्द्र दर्डा (काँग्रेस)
28   पैठण  संजय वाकचौरे (राष्ट्रवादी)
29   गंगापूर  प्रशांत बंग (अपक्ष)
30   वैजापूर  आर.एम.वाणी (शिवसेना)

बीड
31   गेवराई  बदामराव पंडित (राष्ट्रवादी)
32   माजलगाव प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
33   बीड  जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी)
34   आष्टी  सुरेश धस (राष्ट्रवादी)
35   केज (एससी) विमल मुंदडा (राष्ट्रवादी)
36   परळी  पंकजा मुंडे-पालवे (भाजप)

लातूर
37   लातूर ग्रामीण  वैजनाथ शिंदे (काँग्रेस)
38   लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस)
39   अहमदपूर बाबासाहेब पाटील (रिडालोस रासप)
40   उदगीर (एससी) सुधाकर भालेराव (भाजप)
41   निलंगा  शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
42   औसा  बसवराज पाटील (काँग्रेस)

उस्मानाबाद
43   उमरगा  ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
44   तुळजापूर  मधुकर चव्हाण (काँग्रेस)
45   उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
46   परांडा  राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मुंबई शहर आणि उपनगर

मुंबई उपनगर
1   बोरिवली गोपाळ शेट्टी (भाजप)
2   दहीसर विनोद घोसाळकर (शिवसेना)
3   मागाठणे प्रवीण दरेकर (मनसे)
4   मुलुंड आंबोली सरदार तारासिंह (भाजप)
5   विक्रोळी मंगेश सांगळे (मनसे)
6   भांडुप पश्चिम शिशीर शिंदे (मनसे)
7   जोगेश्वरी पूर्व रविन्द्र वायकर (शिवसेना)
8   दिंडोशी राजहंस सिंह (काँग्रेस)
9   कांदिवली पूर्व रमेश सिंग ठाकूर (काँग्रेस)
10  चारकोप योगेश सागर (भाजप)
11   मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस)
12   गोरेगाव सुभाष देसाई (शिवसेना)
13   वर्सोवा  बलदेव खोसा (काँग्रेस)
14   अंधेरी पश्चिम अशोक जाधव (काँग्रेस)
15   अंधेरी पूर्व सुरेश शेट्टी (काँग्रेस)
16   विले पार्ले  कृष्णा हेगडे (काँग्रेस)
17   चांदिवली  नसीम खान (काँग्रेस)
18   घाटकोपर पश्चिम राम कदम (मनसे)
19   घाटकोपर पूर्व प्रकाश मेहता (भाजप)
20   मानखुर्द – शिवाजीनगर अबू आझमी (सपा)
21   अणुशक्तीनगर नबाब मलिक (राष्ट्रवादी)
22   चेंबूर  चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस)
23   कुर्ला (एससी) मिंलिंद कांबळे (राष्ट्रवादी)
24   कलिना   कृपाशंकर सिंग (काँग्रेस)
25   वांदरे पूर्व  बाळा सावंत (शिवसेना)
26   वांदरे पश्चिम वावा सिद्दीकी (काँग्रेस)

मुंबई शहर
27   धारावी (एससी) वर्षा गायकवाड (काँग्रेस)
28   सायन-कोळीवाडा जगन्नाथ शेट्टी (काँग्रेस)
29   वडाळा  कालिदास कोळमकर (काँग्रेस)
30   माहीम  नितीन सरदेसाई (मनसे)
31   वरळी  सचिन अहिर (राष्ट्रवादी)
32   शिवडी  बाळा नांदगावकर (मनसे)
33   भायखळा  मधुकर चव्हाण (काँग्रेस)
34   मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप)
35   मुंबादेवी  अमिन पटेल (काँग्रेस)
36   कुलाबा  ऍनी शेखर (काँग्रेस)

ठाणे आणि कोकण
ठाणे
1   डहाणू (एसटी) राजाराम ओझरे (माकप)
2   विक्रमगड (एसटी) चिंतामण वणगा (भाजपा)
3   पालघर (एसटी) राजेन्द्र गावित (काँग्रेस)
4   बोईसर (एसटी) विलास तरे (बीव्हीए)
5   नालासोपारा क्षितीज ठाकूर (बीव्हीए)
6   वसई विवेक पंडित(सेना पुरस्कृत)
7   भिवंडी ग्रामीण ( एसटी) विष्णु सावरा (भाजप)
8   शहापूर (एसटी) दौलत दरोडा (शिवसेना)
9   भिवंडी पश्चिम  रशिद ताहीर मोमीन(सपा)
10   भिवंडी पूर्व अबू आझमी (सपा)
11   कल्याण पश्चिम प्रकाश भोईर (मनसे)
12   मुरबाड  किसन कथोरे (राष्ट्रवादी)
13   अंबरनाथ (एससी) डॉ.बालाजी किणीकर(शिवसेना)
14   उल्हासनगर कुमार ऐलानी (भाजप)
15   कल्याण पूर्व गणपत गायकवाड (अपक्ष)
16   डोंबिवली रविन्द्र चव्हाण (भाजप)
17   कल्याण ग्रामीण रमेश पाटील (मनसे)
18   मीरा भायंदर गिल्बर्ट मेंडोसा (राष्ट्रवादी)
19   ओवळा – माजिवडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
20   कोपरी – पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
21   ठाणे राजन विचारे (शिवसेना)
22   मुंब्रा – कळवा जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी)
23   ऐरोली संदीप नाईक (राष्ट्रवादी)
24   बेलापूर गणेश नाईक (राष्ट्रवादी)

रायगड
25   पनवेल प्रशांत ठाकूर (काँग्रेस)
26   कर्जत सुरेश लाड (राष्ट्रवादी)
27   उरण विवेक पाटील (शेकाप)
28   पेण धैर्यशील पाटील (शेकाप)
29   अलीबाग मीनाक्षी पाटील (शेकाप)
30   श्रीवर्धन सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
31   महाड भरत गोगावले (शिवसेना)

रत्नागिरी
32   दापोली सूर्यकांत दळवी (शिवसेना)
33   गुहागर भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
34   चिपळूण संगमेश्वर सदानंद चव्हाण (शिवसेना)
35   रत्नागिरी उदय सामंत (राष्ट्रवादी)
36   राजापूर राजन साळवी (शिवसेना)

सिंधुदुर्ग
37   कणकवली प्रमोद जठार (भाजप)
38   कुडाळ नारायण राणे (काँग्रेस)
39   सावंतवाडी दीपक केसरकर (राष्ट्रवादी)

पश्चिम महाराष्ट्र
पुणे
1   जुन्नर वल्लभ बेणके (राष्ट्रवादी)
2   आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
3   खेड आळंदी दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
4   शिरूर  अशोक पवार (राष्ट्रवादी)
5   दौंड रमेश थोरात ( राष्ट्रवादी बंडखोर)
6   इंदापूर हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
7   बारामती अजित पवार (राष्ट्रवादी)
8   पुरंदर विजय शिवथरे (शिवसेना)
9   भोर संग्राम थोपटे (काँग्रेस)
10   मावळ बाळा भेगडे (भाजप)
11   चिंचवड लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी बंडखोर)
12   पिंपरी (एससी) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
13   भोसरी  विलास लांडे (राष्ट्रवादी बंडखोर)
14   वडगाव शेरी बापू पाठारे (राष्ट्रवादी)
15   शिवाजीनगर विनायक निम्हण (काँग्रेस)
16   कोथरूड चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)
17   खडकवासला  रमेश वांजळे (मनसे)
18   पर्वती  माधुरी मिसाळ (भाजप)
19   हडपसर महादेव बाबर (शिवसेना)
20   पुणे छावणी (एससी) रमेश बागवे (काँग्रेस)
21   कसबा पेठ गिरीश बापट (भाजप)

अहमदनगर
22   अकोले (एसटी) मधुकर पिचड (राष्ट्रवादी)
23   संगमनेर बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
24   शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस)
25   कोपरगाव अशोकराव काळे (काँग्रेस)
26   श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
27   नेवासा शंकरराव गडाख (राष्ट्रवादी)
28   शेवगाव चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी)
29   राहुरी शिवाजीराव कर्डिले (भाजप)
30   पारनेर विजय औटी (शिवसेना)
31   अहमदनगर शहर अनिल राठोड (शिवसेना)
32   श्रींगोंदा बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी)
33   कर्जत जामखेड राम शिंदे (भाजप)

सोलापूर
34   करमाळा श्यामल बागल (राष्ट्रवादी)
35   माढा बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
36   बार्शी दिलीप सोपल (राष्ट्रवादी बंडखोर)
37   मोहोळ (एससी) लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी)
38   सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख (भाजप)
39   सोलापूर शहर मध्य प्रणिती शिंदे (काँग्रेस)
40   अक्कलकोट सिद्रामप्पा पाटील (भाजप)
41   सोलापूर दक्षिण दिलीप माने (काँग्रेस)
42   पंढरपूर भारत भालके (राष्ट्रवादी बंडखोर)
43   सांगोले गणपतराव देशमुख (शेकाप)
44   माळशिरस (एससी) हणमंत डोळस (राष्ट्रवादी)

सातारा
45   फलटण (एससी) दीपक चव्हाण (राष्टवादी)
46   वाई मकरंद पाटील (राष्ट्रवादी बंडखोर)
47   कोरेगाव शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
48   माण जयकुमार गोरे (काँग्रेस बंडखोर)
49   कराड उत्तर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी बंडखोर)
50   कराड दक्षिण विलासकाका उंडाळकर (काँग्रेस)
51   पाटण विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी)
52   सातारा शिवेन्द्रराजे भोसले (राष्ट्रवादी)

कोल्हापूर
53   चंदगड बाबासाहेब कुपेकर(राष्ट्रवादी)
54   राधानगरी के.पी.पाटील (राष्ट्रवादी)
55   कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
56   कोल्हापूर दक्षिण सतेज पाटील (राष्ट्रवादी)
57   करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना)
58   कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना)
59   शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य)
60   हातकणंगले डॉ. सुजीत मेणचेकर (शिवसेना)
61   इचलकरंजी सुरेश हळवणकर (भाजप)
62   शिरोळ सा.रे.पाटील (काँग्रेस)

सांगली
63   मिरज (एससी) सुरेश खाडे (भाजप)
64   सागंली वाळवा संभाजी पवार (भाजप)
65   इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी)
66   शिराळा मानसिंग नाईक (राष्ट्वादी बंडखोर)
67   पळूस – कडेगाव पतंगराव कदम (काँग्रेस)
68   खानापूर सदाशिव पाटील (काँग्रेस)
69   तासगाव – कवठे महांकाळआर.आर.पाटील (राष्ट्रवादी)
70   जत प्रकाश शेंडगे (भाजप)

जय हिंद….! जय भारत….! जय माहाराष्ट्र….!

Leave a comment »

धुरचे लोट आणी राखेचा ढिग……!

आज सकाळी उठ्ल्यावर काही कळ्त नव्हत, काहीतरी विसरल्या सारख वाटत होत‌‌. काय विसरलोय मी…? अरे काल रत्री सिगारेट आणायच विसरलो. रोज सकाळी उठल्यावर सिगरेट पाहिजेच अस काही नाही, तरिही आता सवय झालिये, सकाळी उठल्यावर म. टा. आणी एक सिगरेट असली की दिवस कसा छान जातो. ही सिगरेट काही जिवनाचा अविभाज्य घटक नाही, की नसेल तर माझा जिव जाईल, पण आता सवय झाली आहे. सुरवातीला ज्या वेळेस सिगरेट प्यायला लागलो त्या वेळेस एक नवा प्रयोग म्हणुन सुरु केली. तसा मी सिगरेट सोडणार आहे, हे माझ रोजच वाक्य आहे. मला एक सवय आहे लहाणपणा पासुन मी एखादी गोष्ट हाती घेतली की ती पुर्णत्वास गेल्याशिवाय सोडत नाही. मला माहीत आहे एक दिवस असा निघेल ज्या दिवशी मी परत एक नविन पोस्ट लिहेल “मी सिगरेट सोडली” तो दिवस लवकरच येणार आहे. माझा एक नियम आहे कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती पुर्णपणे करावी मधेच सोडु नये. शाळेत असतान क्रीकेट खेळायचो, मन भरेपर्यन्त खेळलो, मरही खाल्ला आईच्या हातचा, पाण एके दिवशी वाटल बास आता पुरे झाल खेळनं, सोडुन दिल. कॉलेज मधे असताना कवीता लिहायचा भारी छंद होता मला, बरेच दिवस पानं काळी केली. शेवटी मरठिचे सर म्हणाले, “बस झालं तुमचं लिखाण शिरसाट” तरीही वर्षभर आम्ही पनं काळी करतच होतो. एक दिवस असच वाटलं बास झालं आत, पुरे ह्या कविता, आणी सोडला मी माझा कवीतांचा छंद. हा पण एक गोष्ट मी ज्या वेळॆस माझ्या घरी असतो त्या वेळेस मला सिगरेट प्यायचि ईच्छा सुध्धा होत नाही, विल पावर चांगलं आहे आमचं. खरं सांगायच झाल‍ तर मित्रांनो ” मि सिगरेट सोडली”…. विश्वास नाही बसत ना…? तेच, हे मित्रांना समजाउन सांगायला मला जवळ्पास तिन दिवस लागले. खरच वाटत नव्हतं त्यांना. आता माहीत नाही तुम्हि लोक किती टिंगल करणार. बर असो मला प्रत्येकाला सांगायचं आहे की कुणी म्हणते म्हणुन आपली सवय सोडु नका. कधिही मनाचं ऎका. मन कधिच खोटं बोलणार नाही तुमच्याशी.

Comments (2) »

म-हाटा तितुका तोडावा…!

 

मराठी समाजात दुफळी माजवून त्याचा पराभव करणे, ही कला मराठीद्वेष्ट्यांनी इतिहासकाळापासून वापरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया करून दुष्मनांची शाबासकी मिळवणारे मराठे सरदारच होते. पेशवाई बुडवण्यास मराठे सरदारांमधील सुंदोपसुंदीच कारण ठरली आणि इंग्रजांविरुद्ध एकाकी झुंजणाऱ्या झाशीच्या राणीशी फितुरी करणारेही स्वकीयच होते. आप्तजनांकडूनच दगाफटका होण्याची दुदैर्वी परंपरा मराठी समाजात एकविसाव्या शतकातही तशीच राहावी, याला काय म्हणावे?

प्रत्येक निवडणुकीच्या आगेमागे अनेक विषयांचे काहूर घोंघावत असते आणि निकाल लागल्यावर त्यांचे कवित्व पुढे बराच काळ चालू राहते. त्यात अनेकांना रस असतोच असे नाही, तरीही विजयाच्या उन्मादाचे चित्कार आणि पराभवाचे कण्हणे ऐकू येतच राहते. देशाच्या पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए)ने घवघवीत यश मिळवत एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)चे पेकाट मोडले, तर दुसऱ्या बाजूला तिसऱ्या आघाडीचा फज्जा उडवला. या विषयावर बरेच काही बोलले-लिहिले गेल्याने त्याविषयी पुन्हा लिहिण्याचे कारण नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर काँग्रेसला फारसे काही न करताच यश मिळाले. टेनिसच्या खेळात समोरचा खेळाडू डबल फॉल्ट करत राहतो आणि पहिल्या खेळाडूला न खेळताच गुण मिळत राहतात. काँग्रेसचे तसे झाले व अनपेक्षित विजयही मिळाला. अर्थात, यश हे अखेर यश असते. ते कसे मिळाले, हे प्रश्न केवळ औपचारिक बनतात. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालेले यश का व कसे मिळाले, याच्याही खोलात न गेलेले बरे!

या निकालांमुळे मुंबई आणि तिचा परिसर पुन्हा चचेर्च्या मध्यभागी आला. गेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईत मराठी माणसाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी ‘मुंबई कोणाची?’ हा प्रश्न विचारला गेला व मुंबईकर मराठी माणसाने त्याचे चोख उत्तर दिले. पण तरी प्रश्न संपला नाही. तो धुमसत राहिला आणि लोकसभेच्या निवडणुकीत या जळत्या निखाऱ्यांवरील राख घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे उडाली आणि ज्वाळा पुन्हा भडकल्या. दुदैर्वाची गोष्ट ही की, गेल्या निवडणुकीत प्रतिर्स्पध्यांना जाळून खाक करणाऱ्या या ‘मराठीपणा’च्या आगडोंबाने यावेळी मराठी माणसाचाच घात केला आणि मराठी माणूस या लढाईत पराभूतही झाला.

यात कोणाला दोष देण्याचे वा कोणाची बाजू घेण्याचे कारण नाही. राजकारणात उतरणारे सर्व राजकीय पक्ष आपला राजकीय स्वार्थ जपतात आणि निवडणुकीत सर्वच जण यशासाठी झुंजतात. तसेच याही वेळी झाले. ‘मराठी माणूस’ हे एक सोपे शस्त्र राजकीय नेत्यांच्या हाती लागले आणि त्याच्या साह्याने लढाई करताना आपल्या हातून हे शस्त्रच मोडून गेले, याचे भान उरले नाही. मराठी माणसासाठी ही बाब केवळ दुदैर्वाची नव्हे, तर शरम आणि निषेधाची आहे. अर्थात, या लढाईत बळी गेलेल्या मराठी माणसाने दोष कोणाला द्यायचाच, तर तो स्वत:ला द्यायला हवा. महाशक्तिमान हत्तीला पकडणे शक्य नसते; तेव्हा जंगलात मोठे खड्डे खणले जातात आणि त्यावर पालापाचोळा अंथरला जातो. स्वत:च्या मस्तीत राहणारा हत्ती निष्काळजीपणाने जंगलात खुशाल चालत राहतो आणि अलगद खड्ड्यात पडून कायमचा बंदिवान होतो. त्याने दोष कोणाला द्यायचा? खड्ड्याला, तो खणणाऱ्याला, नशिबाला की, स्वत:च्या निष्काळजीपणाला? मराठी माणसाचे नेमके तेच झाले. तो निष्काळजी व स्वत:तच मश्गुल राहिला व या निवडणुकीत पराभूत झाला.

एका निवडणुकीतील यश वा अपयशामुळे कोणताही समाज विजयी वा पराभूत होतो, असे मानण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद कोणी करेल. तो योग्यही आहे. परंतु एखादे युद्ध ज्या घोषणेवर लढवले जाते, ती घोषणाच फसवी ठरून पराभूत झाली, तर काय करायचे? मराठी माणसाचे मुंबईतील अस्तित्व या निवडणुकीत डावावर लावण्यात आले. तसे करण्याचे काहीच कारण नव्हते. या निवडणुकीसमोर बेकारी, भाववाढ, सुरक्षितता, बकाल नागरी जीवन हे आणि असे अनेक नागरी प्रश्न होते. अन्य भाषिक व धामिर्क गटांबरोबरच मराठी समाजाला तेही सतावत होतेच. लोकसभेच्या निवडणुका या आणि अशा मुद्द्यांवर व्हायला हव्या होत्या. महाराष्ट्राच्या अन्य भागांत विजेची टंचाई, शेतकऱ्यांची हलाखी असे प्रश्न होते. मुंबई परिसरातही या महानगरवासियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची निर्णायक चर्चा होऊ शकली असती. मुंबईवर भयानक अतिरेकी हल्ला झाला, पण मुंबईकरांना त्याची क्षिती नाही, असे दृश्य दिसते. त्याबद्दल आता या मराठीच्या लढवय्यांना काय म्हणायचे आहे?

बरे, मराठीचा मुद्दा उपस्थित करून तो जिंकण्याचीही काळजी घेतली गेली नाही. या महानगरात आजही सर्वांत मोठा भाषिक गट मराठीचा आहे. तो जोपर्यंत दुभंगत नाही, तोपर्यंत मराठी समाजच राज्य करणार, हे ज्यांच्या ध्यानात आले, त्यांनी खुबीने मराठीचेच शस्त्र मराठी समाजासाठी वापरले. समुदात मोठ्या युद्धनौकांना हवेतून पाण्यावरून हल्ले करून बुडवता येत नाही, तेव्हा समुदाखालून पाणबुड्यांच्या साह्याने टापेर्डोंचा मारा केला जातो. हे टापेर्डो कधी पाण्याच्या वर कधी दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचा हल्ला केव्हा झाला व आपल्या युद्धनौकेच्या तळाला भगदाड पडून पाणी आत केव्हा शिरू लागले, तेच नौसैनिकांना समजत नाही. जेव्हा उमगते, तेव्हा नौका बुडलेली असते.

मराठी समाजात दुफळी माजवून त्याचा पराभव करणे, ही कला मराठीद्वेष्ट्यांनी इतिहासकाळापासून वापरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया करून आदिलशाही, निजामशाही व मोगल यांची शाबासकी मिळवणारे अनेक मराठे सरदारच होते. पेशवाई बुडवण्यास भोसले, होळकर, शिंदे अशा मराठे सरदारांमधील सुंदोपसुंदीच कारण ठरली आणि इंग्रजांविरुद्ध एकाकी निकराची झुंज देणाऱ्या झाशीच्या लक्ष्मीबाईंबद्दल फितुरी करणारेही स्वकियच होते. आप्तजनांकडूनच दगाफटका होण्याची सतराव्या शतकापासून चालू झालेली दुदैर्वी परंपरा मराठी समाजात एकविसाव्या शतकातही तशीच राहावी, याला काय म्हणावे?

मराठी माणसाच्या मुठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच आवळल्या जात असल्या आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणेने त्याचा ऊर भरून येत असला, तरी तो केवळ घोषणा देतानाच ‘मराठी माणूस’ असतो, हे ही दाहक वास्तव आहे. सकाळी दूधवाल्याकडून दूध घेताना, दुपारच्या सुटीत उडप्याकडे खाताना, संध्याकाळी भय्याकडून भाजी घेताना, रिक्षाने घरी येताना आणि टीव्हीवरच्या सासू-सुनांच्या मालिका पाहताना तो मराठी नसतोच. तसेच, निवडणुकांत तो एकवटून मराठी म्हणून मतदान करत नाही. त्यातच त्याच्या मानापमानाच्या कल्पना विचित्र. दाक्षिणात्य बॉस आणि रेल्वेच्या र्फस्ट क्लासमधील सटोडियांची अरेरावी निमूट सोसणाऱ्या या मराठी माणसाला ‘अभिमान’ या सदराखाली एकमेकांपासून तोडले जाते, हे समजत नाही. ‘मऱ्हाटा तितुका मेळवावा’ म्हणतानाच ‘मऱ्हाटा तितुका तोडावा’चा कट कोणी कसा अमलात आणला, हे ही त्याला समजले नाही.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकात महत्त्वाची बाब ही की, पुनर्रचित मतदारसंघांचा विचार करता मुंबई महानगर प्रदेशातून २८८ सदस्यांच्या विधानसभेतील तब्बल ६९ आमदार निवडून जाणार आहेत. म्हणजे एक चतुर्थांशपेक्षा अधिक आमदार या टापूतून विधानसभेत जातील. जर त्यावेळीही मराठी समाज असा दुभंगला, तर त्याच्या नक्कीच चिरफळ्या उडतील आणि आता ‘मुंबई कोणाची?’ असा प्रश्न विचारला जातो पण काही महिन्यांनी ‘महाराष्ट्र कोणाचा?’ असा प्रश्न विचारण्याची पाळी येईल.

राजकारणातील निवडणुकांच्या धुमश्चक्रीत कोण जिंकले व कोण हरले, हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा हे जिंकणे व हरणे वा कोणाला तरी हरवणे, हे सारे कोणासाठी? हा आहे. ज्याच्यासाठी शस्त्रे पाजळायची, त्याचाच पराभव आपल्याच शस्त्रांनी होत असेल, तर अशा विजयाचा काय उपयोग? कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर जे योद्धे विव्हळत पडले होते, त्यांना पांडव जिंकले, याचा आनंद नव्हता व कौरव हरल्याचे दु:ख नव्हते. त्यांना वेदना होती, ती अंगावरील असंख्य जखमांची आणि भय होते, ते त्यांचे लचके तोडण्यासाठी आकाशात घिरट्या घालणाऱ्या गिधाडांचे. ते जर जखमी नसते, तर त्यांच्या बाणांनी गिधाडांचाच वेध घेतला असता, पण ते स्वकियांनीच केलेल्या वारांमुळे विकल झालेले आणि हाती शस्त्र घेण्याची शक्तीही लोप पावलेली.

मराठी समाजाची अशी अवस्था झाली तर? त्या पराभवाचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे?

Comments (6) »

पोलिसांना सुट्ट्या मिळणार कधी?

मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला, एप्रिलची लोकसभा निवडणूक, दहीहंडी, गणपती, ईद, विधानसभा निवडणूक, नंतर येणारी दिवाळी हा घटनाक्रम राज्यासह मुंबई पोलिसांसाठी पोटात गोळा आणणारा आहे! मुंबई हल्ल्यासारखा अपवादात्मक प्रसंग वगळता बाकी सर्व ‘इव्हेंट’मुळे पोलिसांना हकनाक सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागते आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघा महिनाभराचा कालावधी सोडल्यास साप्ताहिक ते साऱ्याच सुट्ट्यांवर गदा आलेले पोलिस कुणीही हाका… या मनस्थितीला कंटाळले आहेत.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी ही ४२ हजारांची फौज असलेल्या मुंबई पोलिस दलासाठी स्वप्नवत ठरले आहे. किमान बारा तासांची ड्युटी करणाऱ्या पोलिसांना तब्बल दहा महिने सुट्ट्यांच्या दुष्काळातून जावे लागत असले तरी त्याविषयी ना खेद ना खंत अशीच भूमिका उच्चस्तरीय अधिकारी आणि सरकारदरबारी राहिली असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. १३ ऑक्टोबरची विधानसभा निवडणूक झाल्यावर तरी सुट्ट्यांचा प्रसाद मिळण्याची आशा लगेचच येणाऱ्या दिवाळीमुळे धुळीस मिळाली आहे. ही गैरसोय असतानाच साप्ताहिक सुट्टीबदल्यात मिळणारा मेहनताना सामान्य कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून मिळालेला नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. याबाबत निधी उपलब्ध नसल्याची कारणे कार्यालयातून मिळत असल्याची खंत अनेक कॉन्स्टेबल व्यक्त करत आहेत.

सुट्ट्यांची कमतरता भरून काढणे दूरच, पण किमान एक दिवस कुटुंबासोबत राहण्याची इच्छा कधी फलदूप होणार, हा साऱ्यांचा प्रश्ान् आहे. लोकसभा निवडणुकीनंतरचा साधारण महिना वगळता साप्ताहिक सुट्टीची वानवा असल्याची खात्यातील तक्रार आहे. या निवडणुकीनंतरही लगेचच घरी जाता येईल, असेही नसते. मंगळवारी मतदानकेंदावर ड्युटी असलेल्या साऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या मतदानपेट्या संबंधित भागातील ‘स्ट्राँग रूम’मध्ये जमा होईपर्यंत सुटका नसते. त्याप्रमाणे, मंगळवारी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत त्यांची ड्युटी सुरूच होती.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सुट्ट्या बंदचा सामना करणारा हा फौजफाटा निवडणूक तयारीस लागला होता. दिवाळी संपेपर्यंत सुट्टी मिळण्याची शक्यता नाही. त्यानंतर आणखी कुठले सण वा महत्त्वाची घटना झाल्यास प्रथम सुट्ट्यांवर संक्रात येईल, ही भीती त्यांना आहे. असे असताना अपवाद वगळता ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सरकारी नियमांप्रमाणे सुट्ट्यांचा आनंद घेण्यास विसरत नसल्याची आठवणही करून दिली जात आहे.

असे असले तरीही निवडणुकीपासून साऱ्या प्रसंगांत पोलिस दल ठामपणाने उभे राहते. त्यातच, या निवडणुकीत शिवसेना-मनसे तणावाचीही स्थिती होती. अशावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणूनही खास काळजी घेण्यात आली. ऐन निवडणुकांत त्यांच्यातील संघर्ष उफाळून येऊ नये, म्हणून साऱ्या यंत्रणेस तत्पर राहावे लागले होते. अशा स्थितीत, किरकोळ अपवाद वगळता पार पडलेल्या निवडणुकांत सत्तेचे सोपान कोणाला मिळणार याच्या चर्चा सुरू होतील आणि आमची स्थिती जैसे थे राहील.

Comments (4) »

उद्धव-राज रायगडावर महाराजांना भेटतात तेव्हा…

‘ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय II’ (लोकसभा निवडणुकीनंतरचा)…सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करायचेय, ती म्हणजे पुढे आपण जो प्रसंग वाचणार आहात, तो संपूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा कदापि संबंध नाही. तुम्हाला वाटला तर तो निव्वळ योगायोग समजा…कारण कुणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. किंबहुना मराठीजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्रपंच… तर, महेश मांजरेकरांचा ‘ मी शिवाजीराजे… ’ आपण सगळ्यांनी पाहिला आहेच. त्यातली शिवाजी महाराजांची एन्ट्री आठवा… ‘ लाज वाटते मराठी म्हणून जन्माला आल्याची, लाज वाटते ’, हे दिनकरराव भोसलेंचे हताश, हतबल उद्गार ऐकून व्यथित झालेले छत्रपती शिवाजी महाराज, आपले मावळे पाठवून दिनकररावांना रायगडावर बोलावून घेतात आणि त्यांची चांगलीच कानउघाडणी करतात. आता ‘ पार्ट II’ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर महाराज त्याहूनही अधिक व्यथित झालेत आणि चिडलेतही. (का ?, ते आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे.) तर, यावेळी त्यांनी आपले दोन मावळे ‘ मातोश्री ’ वर आणि दोन ‘ कृष्णकुंज ’ वर (किंवा कृष्णभुवन) पाठवले आणि ते उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना रायगडावर घेऊन गेले. कट टू रायगड… (महाराजांचा दरबार भरलेला. राज आणि उद्धव झोपेतून जागे होतात. एकमेकांकडे पाहतात आणि लगेचच तोंड फिरवतात. पुढच्याच क्षणाला समोर साक्षात छत्रपतींना पाहून दोघंही थक्क होतात. बाळासाहेब आणि बाबासाहेबांनी (पुरंदरे) शिकवल्याप्रमाणे दोघंही लवून महाराजांना मुजरा करतात.)

उद्धव-राज एकत्रः महाराज आपण ?
महाराजः होय…मी !
राजः महाराज, आपण स्वतः येण्याची तसदी घेतलीत ?
महाराजः न येऊन कसं चालणार होतं ?
उद्धवः का महाराज ? आमचं काही चुकलं का ?
महाराजः चुकलं ? अहो, घोडचूक झालेय तुमच्याकडून. भाऊबंदकीचा शाप आपल्या महाराष्ट्राला नवा नाही. मात्र, तुमच्या भाऊबंदकीचा त्रास माझ्या मराठी बांधवांना, माता-भगिनींना भोगावा लागतोय. म्हणूनच तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतलंय आम्ही…
राजः नेमकं काय झालंय महाराज ?
महाराजः काय झालंय ? दो ही मारा, पर सॉल्लिड मारा, हे तुमचे उद्गार ऐकलेत आम्ही ! अहो, पण ते दोन रट्टे माझ्या मराठी माणसालाच लागलेत ना !
(राजला झापल्याचं पाहून उद्धव गालातल्या गालात हसतात. तेव्हाच महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे जातं.)
महाराजः उद्धवसाहेब तुमचीही प्रतिक्रिया वाचली आहे आम्ही. मराठीचं काय करायचं ते मनसेला विचारा, असं सांगून तुम्ही मोकळे झालात. तुमचं दोघांचं जे काही चाललंय, ते कितपत योग्य आहे ?
राजः महाराज, आमच्यात काय झालंय ते बहुतेक तुम्हाला ठाऊक नाही.
महाराजः आम्हाला ठाऊक नाही ? गनिमी कावा काय असतो हे आम्ही तुम्हाला शिकवलं. त्यावेळचे आमचे गुप्तहेर आजही तितकेच समर्थ आहेत. महाराष्ट्रात जे काही होतंय, ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचतंय. विशेषतः, शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तर आमचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तुमच्यात काय झालं, कसं झालं, हे सगळं आम्ही जाणतो. अगदी २७ नोव्हेंबर २००६ पासून, किंबहुना त्या आधीपासूनचा सारा घटनाक्रम आम्हाला ठाऊक आहे. मराठी माणसाला हक्काचे दोन नेते मिळतील, असं आम्हाला त्यावेळी वाटलं होतं. पण हे सगळं भलतंच घडतंय.
उद्धवः महाराज, पण लोकसभा निवडणुकीत जे काही झालं, तो तमाशा ‘ राजा ’ मुळेच झालाय ना ? त्याची जी काही ‘ बकबक ’ चाललेय, त्यामुळेच मराठीच्या दुश्मनांचं भलं होतंय. त्यामुळे त्यानं सुधारायला हवं.
राजः महाराज, तुम्हीच सांगा कोण चुकतंय ? मराठी माणसाचा आवाज उठवण्याचा मी प्रयत्न केलाय. आमच्या ‘ दादू ’ ला मराठीचा एवढाच पुळका आलाय, तर त्यांचे ११ खासदार काय नेपाळी आहेत का ?

महाराजः (अधिकच संतापतात) … खबरदार ! ही सगळी भाषणात ऐकवायची वाक्यं आम्हाला ऐकवू नका. ती आधीच ऐकली आहेत आम्ही आणि त्यामुळेच व्यथित झालो. खरं तर आधीच बोलावून, तुम्हाला खडसावण्याचा विचार होता. पण म्हटलं, तुम्ही सुजाण आहात, हुशार आहात, सगळं ठीक होईल. पण कसलं काय, तुम्ही तर माझ्या मराठी माणसांमध्ये फूट पाडताय. हे आम्ही सहन नाही करू शकत.
राजः (अत्यंत खेदाने) असं नका म्हणू महाराज, बरं का !
महाराजः तुम्हीच भाग पाडलंय मला हे सगळं ऐकवायला. अतिरेक झालाय सगळा. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेची, मराठी माणसाच्या संघटनेची काळजी वाटतेय आता आम्हाला. काय वाटत असेल त्यांना हे सगळं पाहून ? लोकसभा निवडणुकीत मराठी माणसामुळे, मराठी माणसाचं पानिपत झालं आणि तरीही तुमचं वाक्-युद्ध सुरूच आहे, ही बाब आमच्या मनाला चटका लावून गेली आहे. याचसाठी का केला होता अट्टाहास ? याचसाठी का मराठा तितुका मेळविला होता ?

(दरबार शांत. राज-उद्धव अंतर्मुख होऊन विचार करत असतात. महाराज दोघांकडेही पाहतात.)

उद्धवः महाराज, तुमच्या मते हा दोष कुणाचा ?
महाराजः चूक तुम्हा दोघांचीही आहे.
राज-उद्धव एकत्रः ती कशी
महाराजः आठवून पाहा शिवचरित्र. सगळ्या मराठींना-मराठ्यांना-माझ्या या सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन आम्ही लढलो नसतो, तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं असतं का ? शाहीर बाबासाहेब पुरंदरे आमचे चरित्र सांगताना हे प्रत्येक वेळी सांगतात. तुम्ही दोघंही ते बालपणापासून ऐकत आहात. कळतंय सगळं पण वळत नाही आहे.
राजः असं का म्हणता महाराज ?
महाराजः अहो , शिवाजी काय म्हणतो हे तुम्ही तुमच्या भाषणांतून कायम सांगत असता . पण ते कृतीत उतरलं नाही . पहिले ते राजकारण , हे तुम्ही लक्षात ठेवलेत , पण त्यातलं सावधपण तुम्ही विसरलात . पांडव आणि कौरव एरव्ही एकमेकांच्या विरोधात होते . पण तिसरा शत्रू आला की ते १०५ होते . पण तुम्ही एकमेकांविरोधात लढत राहिलात आणि त्यात ‘ शत्रूं ’ चा फायदा झाला . आता मला मुंबई – ठाण्यातल्या माझ्या मराठीजनांची काळजी वाटतेय . त्यांचं रक्षण तुम्हालाच करावं लागेल .

उद्धव-राज एकत्रः ते कसं शक्य आहे महाराज ?
महाराजः का शक्य नाही ? मराठी माणसाचा उद्धार करण्याचं, महाराष्ट्राचं भलं करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे ना…मग का नाही शक्य ? लोकसभा निवडणुकीतले मतांचे आकडे बघा. मतांचं विभाजन झालं नसतं, तर विजय मराठी माणसाचाच होता. विधानसभा निवडणुकीत तशी रणनीती आखा. हवं तर आमची प्रत्येक लढाई आठवून पाहा आणि त्यातून काहीतरी बोध घ्या. एकत्र आलात, तर उत्तमच…पण वेगळं राहूनही मराठी माणसांसाठी एक होऊ शकता ना ! तसं झालं तर आणि तरच मराठी माणसाला न्याय मिळेल, त्याचा दबलेला ‘ आवाज ’ पुन्हा फुटेल. हा आमचा सल्ला नाही, तर आदेश आहे आणि तुम्हाला आदेश करण्याचा आम्हाला हक्क आहे. आहे ना ?
राजः महाराज , हे काय विचारणं झालं का ?
महाराजः तर मग शपथ घ्या, मराठी माणसासाठी एकदिलानं लढण्याची. शत्रूचा सामना करण्यासाठी तुम्हाला तलवार द्यायची गरज नाही, कारण तुमचे शब्दच तितके धारदार आहेत. त्याचा योग्य वापर करून मराठीच्या शत्रूंना नामोहरम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत !
उद्धव-राजः आम्ही चुकलो महाराज ! आता आम्ही एकदिलानं लढण्याचा प्रयत्न करू.

(या प्रसंगाचा हा शेवट समस्त मराठीजनांची इच्छा लक्षात घेऊन केलाय. काय मंडळी, तुम्हालाही तसंच वाटतंय ना ? )


Comments (2) »

राज साहेबांना मनापसुन विनंती….!

सप्रेम नमस्कार,

आपणास कोण ओळखत नाही…! पण आपण आम्हास नाही ओळखत. बरोबर आहे कितीही झालं तरी आपण मोठे आहात, आणी आमच्यात कुवत नाही आपल्या पर्यंत पोहोचण्याची. खरंच मी ही माहाराष्ट्रात राहणारा एक साधारण युवक आहे, आणी आजही मला वाटतं की राज साहेब हे आम्हा युवकांचे नेते आहेत. कितीही लोकांना राजकारण करु देत, पण साहेब नेहमी आमच्या साठी झगडत राहतील, नेहमी ते आमच्याबद्दल विचार आधी करतिल. कधिही असं वाटत नाही की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात. नेहमी असं वाटत असतं की साहेबांचा डोळ्याला डोळा लागणार नाही, जो पर्यंत माझा माहाराष्ट्र पुर्णॅपणे मराठी होणार नाही. साहेब आपण सर्व मिळुन एकच स्वप्न पाहतोय, की माझा माहाराष्ट्र जगाच्या पाठीवर सर्वात पुढे असावा. आज आपण कुठल्याही परिस्थीतीत कुणाच्याही मागे नाही.
इतक सगळ असुनही हजारवेळा प्रयत्न करुनही आपल्या पर्यंत आम्ही पोहचु शकत नाही? माझ्यासारखे हजारो युवक जे तुम्हाला काही सांगाण्याचा प्रयत्न करतात, का त्यांचा आवाज तुमच्या पर्यंत जात नाही? आज आम्हाला काय पाहिजे काय नाही याचा का कुणी विचार करत नाही. साहेब आपणच आम्हास शिकवले आहे की कुणालाही न घाबरता आम्ही आमचे विचार व्यक्त करु शकतो. मग आज का आमच्या सारखे हजरो युवक गप्प बसुन आहेत? का ते आवाज नाही करत…? का त्यांचा विश्वासच नाही…..! का त्यांना असं वाटतय की आमचं एकणारे कान बंद झालेत….?
साहेब तुम्ही सांगा फक्त आज मिच काय माझ्यासारखे लाखो युवक आहेत जे तुमच्या एका इशार्यावर आपल्या जिवाची बाजी लावयला तयार आहेत…! त्यांच्या मनातलं कोण एकणार…?
मला हे समजत नाही, की ही मायावती कशी काय ६००० करोड रुपये खर्च करुने एक पार्क बनवतेय.. कुठुन आला हा पैसा
आणी काय गरज होती यची….!
साहेब मी म्हणतो की माहाराष्ट्राला अश्या पार्कांची गरज नाहिये,
आज पुणे हे शिक्षणाचे माहेर घर मानले जाते. मग का नाही पुण्यात आय. आय. एम….? का लखनौ मधे आहे….?
का यु. पी. च्या भैय्यांनाच आय. आय. एम. मधे शिकायचा हक्क आहे…?
की मरठी युवकांची लायकी नाही, आय. आय. एम. मधे शिकायची…? का महराष्ट्र सरकार जवळचा पैसा खर्च झालाय…?
का लोकांना असं वाटत की मरठी युवकांना आय. आय. एम. काय आहे हे माहित नाही…?
साहेब मला माहीत नाही की मी जे काही लिहलंय हे कितपत बरोबर आहे, कींवा मला माहित नाही की हे तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही, माला फक्त इतकच सांगायच आहे की खरच आपल्यावर आमचा खुप विश्वास आहे…! याला तडा जाउ देउ नका….!

आणी शेवटी माला सर्व मराठी जनांना हा प्रश्न विचारायचा आहे..?
काय कमी आहे आपल्यात, की आपली माराठी मुलं मागे राहतात..?
“याच एकच कारण आहे शिक्षणाचा अभाव….!”

Comments (5) »

बिल गेट्स बद्दल काही खळबळजनक तथ्य…..!

 

आत्ता परवा मला महाजालावर एक ई-मेल मिळाला, त्यामधे बिल गेट्स याच्या स्थावर मालमत्तेबद्दल काही खळबळजनक गोष्टी निदर्षनास आणल्या होत्या, आता त्यापैकी किती खर्या किती खोट्या याच्याशी आपला काही सोयर-सुतक नाही, निव्वळ मनोरंजनाचा भाग म्हणुन इथे मी पोस्ट टाकतोय.

१) बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतो, म्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियन, आणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!

२) बरं जर समजा याच्या हातुन जर १ हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग ते शोधण्याचाही प्रयत्न करणार नाही, कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!

३) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ ५ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.

४) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही न खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.

५) समजा बिल गेट्स हा जर एखादा देश असता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.

६) विचार करा जर बिल गेट्स ने आपला पैसा १ डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ता बनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसा पोहचवण्यासाठी.

७) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण  संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास ७ मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.

आता शेवट:

८) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणक काम करायचा थांबल्यास(म्हणजेच हॅंग झाल्यास) जर फक्त १ डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त ३ दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.

Comments (4) »

तिने दिलेला आश्चर्याचा धक्का…! (भाग २)

जवळपास ११ वाजे पर्यंत तिची वाट पाहत मि स्टेशन वर बसलेला होतो, सारखी मझी चुळबूळ सुरू होती आता येणार मग येणार. तिचा काही पत्ता नव्हता, ईतक्यात जवळपास तिन वेळा बाहेर जाउन फोन करुन आलो होतो. पण त्याचा काहि फायदा होणार असं वाटत नव्हतं. या सर्व प्रकारात माझी भुक कुठल्या कुठे पळाली होती. समजत नव्हत काय करु ते, एवढ्या वेळात चांगलाच रडकुंडीला आलो होतो मी. शेवटी विचार केला, सरळ गाडी पकडावी आणी पुण्याला निघुन जावं, ही ईतकी कशी निश्काळजी असु शकते, मी येणार हे माहित होतं, आधीपासुनच सगळं ठरलेलं असताना आता हे नविन काय?
मग मनात विचार आला सरळ लोकल पकडुन डोंबिवलीला जावं.
११:२५ ची डोंबिवली लोकल लागली आणी त्यात मी चढलो.
काही वेळातच डोंबिवली स्टेशन आलं, चढनार्या-उतरनार्यांची बरीच गर्दी होती कसातरी वाट काढुन बाहेर आलो, येताना सुद्धा माझी नजर तिलाच शोधत होती. काही वेळात घरचा रस्ता पकडला. जवळच होतं म्हटलं पाईच जातो. वाटेत जाताना ईकडे-तीकडे बराच वेळ बघत होतो पण तिचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी घरी पोहोचलो, दाराची कडी उघडली कुणाचा काही आवाज नाही, घरातही एकदम शांतता. घरात आतमधे गेलो कुणीही दिसत नव्हते, तिला आवाज दिला काही उत्तर नाही, मनात बरिच कालवा-कालव चालली होती. किचन मधे गेलो एका छोट्याश्या टेबलावर छानसा केक मांडुन ठेवलेला होता. संदर अक्षरात मझं नाव लिहलेलं होतं “Happy Birthday Sonya”..
अरे आज माझा वाढदिवस, विसरलोच होतो की…
एकदम सर्वांचा आवाज आला ती हसत होती. सावकाश जवळ येउन तिने विश केलं. आज पर्यंत मी मझा वाढदिवस कधी साजारा केलेला नव्ह्ता, आधी घरचि परिस्तिती नव्हती आणी आता वेळ नव्ह्ता.. विस्म्रुतितुन निघुन गेलं होतं. तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. आणी तीने दीलेला आश्चर्याचा धक्का…!
आत परत मी माझा वाढदिवस साजरा करायचा सोडुन दिलाय. कारण वाढदिवस साजर करणारी तिच नाही आता. मधेच सोडुन गेली..
देउन गेलीय असंख्य आठवणी..! जगतोय मी आठवणीत..! १६ तारखेला होता माझा वाढदिवस, परत त्या सर्व आठवणी भरुन आल्या. आज तो रस्ताही तसच आहे. तिचं घरही तिथेच आहे मीही आहे. पण ती इतकी दुर गेलेली आहे की आठवणीतच तिला मी बघु शकतो.

(समाप्त) सर्व काही संपलय आता.

Comments (5) »

तिने दिलेला आश्चर्याचा धक्का…! (भाग १)

सकाळचे ३ वाजले होते. ऑफिस सुटलं घाई घाईत खाली आलो. त्या वेळी कॉमन ड्रॉप मिळायचा घर कोथरुडला ऑफिस कल्याणी नगर मधे. तसं महित होतं आज घरी जायचं नाहिये रात्रिच तिला फोन केला होता मुंबई ला येतोय म्हणुन. ऑफिसची सर्व काम उरकली होती. आता शनीवार आणी रवीवार दोन दिवस सुट्टीचे. प्रोग्राम आधिच ठरलेला असायचा सकाळी पुण्यातुन सिंहगड एक्सप्रेस पकडायची आणी बरोबर ९:२० ला कल्याण स्टेशन वर उतरायचं ती थांबलेलिच असायची माझी वाट पाहत. दोन दिवस तिच्या घरी. तसं घरातल्या लोकांना कल्पना होती, आणी आता तर सर्वांच्या सक्षीने एंगेजमेंट झालेली होती कुणी काही म्हणायचा प्रश्नच उरला नव्हता. ऑफिस मधुन खाली बेसमेंट मधे पोहोचलो तर गाडी जगेवर उभी होती मि जाउन बसलो ३ जण आणखी यायचे होते मी हळुच ड्रायव्हरला म्हणालो आज स्टेशन वर सोडा माला, त्यालाही नेहमिची सवय झालेली होती काही न बोलता तो फक्त हसला.

बरोबर साडेतीन ला तिघेही जण येउन गाडीत बसले. चेक आउट चे सर्व सोपस्कार आटपुन गाडी निघाली १५ मिनीटात मी स्टेशन वर पोहोचलो. तिकीट काढायला काही खास गर्दी नव्हती आरमात तिकीट काढलं, नेहमिच्या सवईप्रमाणे टाईंम्स घेतला आणी फलाटावर आलो गाडीला अजुन २ तास वेळ होता टाईंम्स वाचता वाचता कसा वेळ गेला काही कळलं नाही बरोबर ५:३० ला गाडीत बसलो जागा मस्त विंडो सिट मिळाली होती खीशातुन आय पॉड काढुन कानाला लावला. ६:०५ ला गाडी पुण्यातुन निघाली. शिवाजि नगर येत नाही तेवढ्यात तिचा फोन आला,

ती “जागा मिळाली का..?”

मी “हो नेहमिच्या विंडो सिटवर बसलोय”

ती “बरं सावकाश ये, मी येते ९ ला स्टेशन वर”

मी “ठीक आहे”

ती हसली आणी फोन ठेवला. सर्व कसं नेहमिसारखं सुरळीत चालु होतं, आत्ता लक्षात आलं मघापासनं काहीतरी विसरल्या सारख वाटत होतं, तिचं गुलाबाचं फुल विसरलो मी, “ओह मॅन हाउ आय़ कॅन डु धिस…!” आज परत ती नराज होणार. जाउदे कल्याणला पोहोचलो की तिला सुंदर मोगर्याचा गजरा घेउन देइन.. गाडी कर्जत ला पोहोचली आता पोटात कावळे कोकलायला सुरवात झाली होती, पण बाहेरचं काहीच खात नाही मी कीतीही भुक लागो. स्वतःलाच सांगितलं आत काही वेळात कल्याण स्टेशन येणार तिथुन लोकल पकडुन डोंबिवलीला जायच तिथुन १० मिनिटाचा घराचा रस्ता घरी जाताना वाटेत तिने स्वतःसाठी आणलेला डबा उघडायचा आणी त्याचा फाडशा पाडायचा, त्या वेळात ती सारखी माझ्याकडे बघत राहणार. हा विचार करता करता कल्याण स्टेशन कधी आलं काही कळलच नाही..
अंगाला आळोखे पिळोखे देतच खाली उतरलो, माहीत होतं ब्रिज वर उभी अशणार. ५ नंबर फलाटावरुन धावत सुटलो ते थेट ब्रीज वरच थांबलो. माझी नजर सारखी तिला शोधत होती. आत्ता दिसेल मग दिसेल असं करता करता १५ मिनीटं झाली ती काही दीसत नव्हती शेवटी न राहउन फोन काढला तर ‘नो सर्व्हिस’ फार राग येतो मला या फोन कंपनिचा स्टेशनच्या बाहेर येउन फोन बुथ वरुन फोन लावला ‘नो रिल्पाय’ मझी धड-धड सुरु झाली असं कधीच झालं नव्हतं. त्यानंतर परत स्टेशन मधे आलो, बराच वेळ २ नंबर फलाटावर इंडीकेटर खाली बसलेला होतो प्रत्येक येणार्या लोकलकडे बघत होतो पण ती काही दिसत नव्हती..
आता मात्र मलाच कळत नव्हत काय करव ते. मनात नको नको ते विचार येत होते….
(क्रमशः)

Leave a comment »